रामायण हे खरंच घडले होते का? त्याचे काही प्रमाण देऊ शकाल का?
कैकैय नरेश युद्धजित यांच्या विनंतीवरून भरत, प्रभु रामचंद्राचे भाऊ यांनी गंधर्व देशास जिंकुन तिथे तक्षशिला व पुरुकलावती नावाचे शहर बसवलीत अस इतिहास आहे।
ऋग्वेदात गांधार निवासीना "गंधरी" अस संबोधलंय.
तक्षशिला हे त्या काळचे महाविद्यालय होते. इथे ध्यान आणि दंड गुरुकुल पद्धतीने शिकवले जायचे. म्हणजे well educated असा योध्या ही तयार व्हायचा.
इंग्रजांनी भारतातील शिक्षण पद्धती फक्त वेद पाठशाळे वर अवलंबून आहे व इंग्रज,पोर्तुगिस,फ्रेंच किंवा डच असेपर्यंत/ स्थिर होई पर्यंत तरी शिक्षणनाचा दृष्टीनेकोण बदलला पाहिजे असे लॉर्ड Macaulay (मॅक्ले) यांनी लेईस्टर(Leicester) येथील व्याख्यानात "19 व्या शकटकाच्या सुरवातीस भारतिय शिक्षण पद्धतीस चतुराई ने हाताळणे " या विषयावर नुसार बदलली.
त्यामुळे आपणास आपल्या संस्कृतीचा जी उत्तुंग, श्रेष्ठ गुणांनी सुशोभित होती.पावित्राता,त्याग,आनंद,शौर्य,उत्सर्ग, राष्ट्र भक्ती ,ज्ञान, कला , व्यापार, विज्ञान, औषधी ने परिपूर्ण अशी ,जी एका मानवास दुसऱ्या मानवाशी जोडण्याचे (एका आत्माचे दुसऱ्या आत्म्याशी शुद्ध मनसा,वाचा, कर्मींनी) चे सूत्र होती यांचे पुरवावे आपणास शोधावे लागतात.
भारतात 16 महाजांनपदांमध्ये राजकीय रित्या विभागून ही विविध धर्म भाषा,जाती,चाली-रीती असलेली ही माणसे सांस्कृतिक रित्या एकत्र होती। त्यामुळे संपूर्ण भारत वर्षा वर राज्य करणे प्राचीन काळापासून कुणालाही जमले नाही.
आज रोजी ज्ञान वेद, पुस्तके, परदेशी इतिहासकार किंवा लेखक यांच्या भारताशी निगडित असलेल्या दुसर्या च विषयाच्या,साहित्यातील टिप्पणी ची मदत घेऊन आपल्या पूर्वजना शोधावं लागतेय.
गांधार देश म्हणजे महाभारतातील गांधारी ज्या देशाची राजकन्या होती तो देश. सध्या पाकिस्तान चा पाश्चिम व अफगाणिस्तान चा पूर्व भाग म्हणजे गांधार देश.
रामायणातील उत्तरकांड मध्ये गांधार देशाबद्दल लिखाण आहे.
अस म्हटले जाते मत्स्य पुराण 48l6;वायू 99,9 गांधार स्वामींना दृहु चे वंशज मानल्या जात जे ययातिच्या 1)पुरु 2)यदु 3)तुर्वस4)दृहु5) ,अनु या पाच पुत्रांपैकी एक होते. 7200 BC म्हणजे आजपासून 9200 वर्षणपूर्वी या 5 भावांचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य होते. याना वेदात पंचांनंद असं म्हंटलं जायचं. कैकैय हे गांधार च्या पूर्वेकडील राष्ट्र होय.
यदु पासून यादव, पुरु पासून पौराव, दृहु पासून भोज, तुर्वसू पासून यवन व अनु पासून म्लेंच्छ वंशाची स्थापना झाली.
सांगायचं तात्पर्य अस की अश्या या गांधार देशाला भरताने जिंकले जो रामचंद्रांचा भाऊ आहे, हे एक प्रमाण राम असण्याचे व त्याचा अस्तित्वाने रामायण घडलेले असणार. बाकी रामायणाचे पुरावे तर इतर ठिकाणी आहेतच.
वेळेअभावी इतकेच लिहितेय, अजून सखोल अभयस करून काही पुरावे मिळलायस नक्कीच उत्तरात रामविष्ट करेल.
Lord Macaulay destroyed traditional Indian Educational System : Dr Bedekar
Comments
Post a Comment