महाभारत कोण रोखू शकत होते? त्या दोन व्यक्ती कोणत्या आहेत?
द्रौपदी आणि दुर्योधन.
- द्रौपदी
महाभारताच्या युद्धाची मुळे ही फार आधीच, मयसभेत रुजली होती. दुर्योधनाने अज्ञातवास पूर्ण करून आलेल्या पांडवांना राज्य देण्यास नकार दिला आणि युद्ध प्रसंग ओढवला. मुळात याला कारण दुर्योधनाच्या मनात असलेला पांडवा बाबतचा तिरस्कार.
या तिरस्काराचे कारण म्हणजे दुर्योधन मयसभेत जमीन समजून चालताना पाण्यात पडला, त्याची सर्व वस्त्रे ओली झाली, आपल्या फजिती मुळे तो गोरामोरा झाला. काहीही झाले तरी राजकुमार तो!
आणि अशा वेळेस, त्याची वहिनी द्रौपदी हिला हसू फुटले. हसता हसता ती काय म्हणते?
“हा हा.. भाऊजी थोडे बघून तरी चालायचं.. पण तुमची तर चूक काय.. शेवटी आंधळ्याचा मुलगाही आंधळाच! “
हे ऐकून कुणाचा तिळपापड होणार नाही? द्रौपदीने आपले जेष्ठ सासरे धृतराष्ट्र यांना आंधळे का म्हणावे? आपल्या घरी पाहुणा आलेल्या दिराचा असा अपमान का करावा? त्यापेक्षा दुर्योधनाला दुसरी वस्त्रे देऊन त्याचा सन्मान करता आला असता. तिच्या या वागण्याने दुर्योधनाच्या मनात द्वेषाचे बीज रोवले गेले.
थोडक्यात व्यवस्थित वागून द्रौपदी भविष्यातील महाभारत थांबवू शकली असती!
2. दुर्योधन
द्रौपदी बोलली आणि ह्याने तिचा व आपल्या भावांचा आयुष्यभर द्वेष केला. पांडवांना द्यूतात हरवून त्यांचे पूर्ण राज्य काढून घेतले. त्यानंतर द्रौपदीला जिंकून घेत, भर दरबारात तीचे केस धरून ओढत आणले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. किती तो राग! एखाद्या स्त्रीचा एवढा अपमान. बर, आता तरी याचा आत्मा शांत व्हावा की नाही? पण नाही.. आधी पांडवांना वनवासात पाठवले आणि नंतर माघारी आल्यावर एक बोटभर सुद्धा राज्य देण्यास नकार दिला.
मुळात दुर्योधनाला मोठेपणा दाखवून द्रौपदीला तिच्या चुकीची जाणीव करून द्यायच्या अनेक संधी होत्या. द्यूतात जिंकलेले राज्य तो परत देऊन समजूतदारपणा दाखवू शकला असता. पण द्वेषाच्या अग्नीत जळून खाक होण्यातच त्याने समाधान मानले.
या दोघा शिवाय अजून काही उदाहरणे देता येतील.. पण माझ्या मते या दोघांनी वेळ प्रसंगी योग्य वर्तन केले असते तर महाभारत नक्कीच घडले नसते!
महाभारत कोण रोखू शकत होते ? त्या दोन व्यक्ती कोणत्या ?
दोन व्यक्ति? इथेच तुमच्या समोर १०-१२ काढतो बघा:
१. राजा शंतनू - सत्यवतीच्या प्रेमात पडला तो पडला त्याच्या पोराने राज्याचे बलिदान दिले तेव्हा राजेसाहेबांना अभिमान वाटला! जर शंतनू ने स्वतःच्या वासनेवर नियंत्रण ठेवले असते तर महाभारत झालेच नसते.
२. भीष्म - आपले वडिल मुर्खपणा करत असले तर आपण अजुन मुर्खपणा करायचा का? का म्हणुन राज्य सोडायचे? ते ही अश्या व्यक्तिच्या नावावर जो अजुन जन्मालाच आलेला नाही.
३. चित्रांगद - कोणी सांगितले होते गंधर्वाबरोबर युद्ध करायला?
४. धृतराष्ट्र - हा भाई येवढा आंधळा असुनही त्याला sixth sense नव्हती. व्यासांनीसुद्धा येऊन सांगितले की दुर्योधनाला सगळे काही देऊ नको. पण मोठ्यांचे कधी ऐकले आहे?
५. कर्ण - धर्माची जाणिव असणारा हा माणूस दुर्योधनाला सांगु शकला असता की बाबा फालतुपणा करु नको. पण त्याने तसे नाही सांगितले.
६. गांधारी - नवरा आंधळा आहे म्हणून त्याला वाट दाखवाची सोडुन बाई स्वतःच आंधळी असायचे सोंग करते.
७. युधिष्ठिर - बाबा रे राजा आहेस तु… जुगार खेळणे शोभते का तुला?
८. पंडू - हरणाची शिकार कोण करतं रे? मारायचाच होता तर वाघ सिंह मारायचा.
९. दुर्योधन - पांडवांना पाच गावात निपटवून टाकले असते तर…
१०. श्रीकृष्ण - देव काहीही करु शकतो. पण म्हणून तो काहीही करेलच असे तर नाही ना… काळाचा प्रभाव बंद करणे कल्किचे काम आहे, कृष्णाचे नाही.
जसे आपण महाभारताकडे ज्या दृष्टीने बघू तसे आपला निष्कर्ष आणि उत्तर असेल हे तर नक्की.
माझ्या मते महाभारत कोणीच रोखू शकले नसते.
- पांडवांना जर त्यांचा न्याय्य हक्क दिला असता तर युद्धच झाले नसते पण दुर्योधनास ते मान्य नव्हते.
- धृतराष्ट्र हे युद्ध रोखू शकला नसता कारण तो तर जणू नामधारी राजा होता आणि दुर्योधन त्याचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
- इच्छामरणाचे वरदान लाभलेले पितामह भीष्माचार्य हे स्वतःच्या शब्दात अडकले होते त्यामुळे त्यांना हस्तिनापूरच्या हितासाठीच लढणे भाग होते. शिवाय दुर्योधनाने त्यांनाच सेनापती केल्यामुळे त्यांना माघार घेणे शक्य नव्हते.
- साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हे युद्ध टळावे म्हणून प्रयत्न केला परंतू उन्मत्त दुर्योधन कोणताही प्रस्ताव ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता.
शेवटी एक लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा गांधारीने श्रीकृष्णाला ‘यादव कूळ नष्ट होईल’ असा शाप दिला तेव्हा श्रीकृष्णाने तिला सांगितले की ‘यादवांच्या कर्माने ते होणारच होते, गांधारीने उगाच तिची शक्ती वाया घालवली.’ त्यामुळे महाभारत अटळ होते ते कोणीच रोखू शकले नसते
तसे पाहता जगात हरक्षणी घडणार्या कोट्ट्यावधी घटना आपण रोखु शकत नाही. आपल्या समाधानासाठी बर्याचवेळा आपण काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणतो. "काळ आला होता पण वेळ आली" नव्हती अशी घटना घडते तेंव्हा परिस्थितीजन्य घटकांचे आपण धन्यवाद मानतो.
महा भारत घडणारच आहे ते कोणी टाळु शकत नाही हे श्रीकृृृष्णाने अर्जुनाला आपल्या मुखात १४ दिवस आधीच दाखवले होते. आपल्या आप्तांचा कसा अंत होणार आहे याचे साध्यांत चित्रण श्रीकृृृृष्णाने घडविलेच होते.
अगदी कर्ण अथवा युधिष्ठीर यांचा अंत होणार हे नक्की असुन सुद्धा अर्जुनाच्या पहिल्याच बाणात त्यांचा अंत का नाही झाला? तर प्रश्नाचे ऊत्तर असे आहे की ती नेमकी वेळ सुद्धा यावी लागते. पूर्ण भोग भोगल्या शिवाय मृृत्यु सुद्धा नाही.
अशा वेळी महाभारतच काय, वेळ येते तेंव्हा कपातुन अंगवार पडणारा गरम चहा सुद्धा पडण्याचे आपण टाळु शकत नाही.
महाभारत कोणी रोकु शकत नव्हते. मुळात महाभारत कोण रोखू शकत होते या पेक्षा कशामुळे महाभारत रोखले गेले असते हा प्रश्न जास्त उचीत आहे.
जगामध्ये अधर्म वाढण्यामागे अधर्मी लोकांच्या वागणुकीचा पेक्षा धार्मिक लोकांचे मौन जास्त योगदान देते. महाभारतात सुध्धा हेच झाले.
धृतराष्ट्र पुत्र मोह मध्ये अडकले होते.
कर्ण हा मित्र प्रेमामध्ये अडकला होता आणि त्याने दुर्योधनाला शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते.
भीष्म आपल्या वचना मुले गप्प होते.
आणि द्रौपदी चे वस्त्र हरण होताना पांडव युधिष्ठिर याच्या शब्दामुळे काही करू शकत नव्हते.
यातील प्रत्येकाची धर्माविषयी स्वतःची एक व्याख्या होती. त्यामुळे मित्था धर्माच्या नावाखाली अधर्म होत गेला.
यातील कोणीही योग्यवेळी धर्म आणि अधर्म यातील भेद समजून अनुकूल असा प्रतिसाद दिला असता तर कदाचित युद्ध टाळता आले असते.
महाभारत होणारच होते नाही तर एका स्त्रीचा अपमान भावअना लाखागृहात जळायचा प्रयत्न यांना शिक्षा मिळणे गरजेचे होते सर्व जन म्हणतात भीष्म त्या काळचे सर्वात बलशाली होते ते बरोबर नाही त्यावेळी हयातीत हे लोक त्यांना आकाश दाखवतात येते फक्त
ते कोण आहे याची जाणीव त्यांना पाहिजे होती
१.श्रीकृष्ण
२.श्रीरूक्मीणी होय बरोबर त्यांना जर जाणीव असती ते कोण आहेत तरी ते श्रीकृष्ण यांच्या प्रमाणे शक्तिमान होत्या त्या श्रीकृष्ण यांच्या त्या शक्ती होता त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे होती
३. प्रद्युम्न त्यांनी साक्षात कार्तिकेय यांना हरवले देवांच्या सेनापतीला
हे धनुर्वेदात पण आणखी काही लोक त्यांना मत देत होते त्या मुळे हा गैरसमज कडावा
त्या कालखंडात या भुतलावर हयात असणाऱ्या किमान ३ व्यक्तिंमध्ये हे युद्ध टाळण्याची क्षमता माझ्या मते होती. श्रीकृष्ण, प्रभु परशुराम आणि महावीर हनुमान. लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे शक्य असुनही यांनी असं केलं नाही कारण मुळात कर्मप्राप्त यातना ह्या भोगाव्याच लागतात आणि या सृष्टीच्या नियमाला कोणीच अपवाद नाही, आणि ह्या साऱ्यांना त्याची पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी महाभारत रोखावं ही अपेक्षाच भाबडी आणि अवास्तव आहे असं मला वाटतं.
महाभारतचं किंवा रामायणाचं घडणं काळाच्या प्रवासातले अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक खंड आहेत.
मला वाटतं की, महाभारत रोखु शकण्याची संभावणा खालील दोन व्यक्तित होती..
१) माता कुंती - मला वाटतं की महाभारत कालखंडात स्त्री ही पुज्य होती. कर्ण हा औरस पुत्र म्हणुन स्विकारला असता तर कदाचीत व्यासांना वेगळ्या पध्दतीने महाभारत लिहावे लागले असते.
२) महर्षी व्यास - खरं तर व्यास हा निसंशय महाभारताचा कर्ता धर्ता व रचियता आहे. त्याचा एक निर्णय म्हणा किंवा एक शिफारस (दैविय गोष्टीचा दाखला देऊन) की, राजा हा त्याच्या पासुन जन्मलेल्या श्रेष्ठ बिजाला निवडावे तर निवड ही न्यायी, विद्वान व पराक्रमी* (* त्याला क्षत्रिय प्रशिक्षण मिळाले असते व अधिकारही) विदुराची झाली असती.
ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते कुठून रोखायच आहे त्यावर अवलंबून आहे.
(तस ते रोखणे शक्यच नव्हतं. वेळोवेळी लेखकांच्या लिखाणात ते विधी लिखित आहे असाच उल्लेख आहे)
तस मी ह्या प्रश्नानाच उत्तर जरा प्रश्न बाजूला ठेऊन द्यायचा प्रयत्न करतो.. जस जिथे जिथे महाभारतात पुरुषी अहंकार बाजूला ठेवता आला असता तेथे तेथे हे युद्ध थांबवता आलं असत.
माझ्या मते महाभारत जो रोखू शकतो ज्याच्यामुळे ते निर्माण झालें आणि तो व्यक्ती होता पितामह भीष्म. त्यांनी जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असता तर महाभारताची पृष्ठभूमीच तयार झाली नसती, परिणामी महाभारत झालंच नसत !
Comments
Post a Comment