कैकेयी

रामाला वनवासास धाडावे या मागणीसाठी विलापाचे निमित्त करणारी कैकेयी व तिला सावरायाला येणारा दशरथ (चित्रकार: राजा रविवर्मा; इ.स. १८९५)

कैकेयी (संस्कृत: कैकेयी ; थाईKaiyakesiकैयाकेसीख्मेरKaikesiकैकेसी ; बर्मीKaikeकैके ; भासा मलायूKekayiकेकायी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती केकय देशाच्या अश्वपति राजाची कन्या होती. दशरथापासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. भरतास अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकेयीस आधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व त्यावर आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकेयीचे स्वभावचित्रण खलनायकी छटेत केले गेले आहे.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या