'अश्वत्थामा' कोण होता आणि तो अजूनही जिवंत आहे का?
अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. गुरु द्रोणाचार्य हे महाभारतामधे कौरव आणि पांडव राजपुत्रांचे गुरु होते. त्यांनी कौरव आणि पांडवांना आपल्या आश्रमात राज्यकारभाराबरोबरच युद्धशास्त्र, नितीशास्त्र, अशा अनेक विद्यांमधे पारंगत केले.
अश्वथामाचा परिचय:
अश्वथामाह्यांना द्रौणी असेही ओळखले जाते जे गुरु द्रोणाचार्य आणि क्रीपी( क्रुपाचार्यांची बहिण) यांचे चिरंजीव आहेत. अश्वथामा हे आपल्या वडिलांबरोबर कौरवांच्या बाजुने पांडवांच्या विरोधात महाभारतात युद्धात लढले. अश्वथामाह्यांना सप्त चिरंजीवांमधे गणले जाते.
अश्वथामा हे महाभारतातील युद्धातून त्यांच्या काकांबरोबर(क्रिपा) जिवंत वाचलेले योद्धा आहेत.
अश्वथामा ह्यांचा जन्म:

गुरु द्रोणाचार्यांनी पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली जो भगवान शंकरांचे गुण धारण केलेला असेल. अश्वथामांना भगवान शंकरांचा
अवतार मानले जाते. अश्वथामा हे चिरंजीव म्हणुन जन्माला आल्यानंतर त्यांना युद्धात हरवणे किंवा त्यांना ठार मारणे अशक्य आहे.
अश्वथामा हे एका मण्यासहीत जन्माला आले होते जो त्यांच्या मस्तकी होता. त्या मण्यामुळे त्यांना भुक आणि तहान ह्यां पासुन तसेच थकव्या पासुन संरक्षण करीत असे.
गुरु द्रोणाचार्यांचा मृत्यु:
युद्धाच्या १० व्या दिवशी भिष्म पितामह शरपंजरी रणांगणी पडल्यानंतर गुरु द्रोणाचर्यांना कौरवांनी त्यांचा सेनापति म्हणुन नियुक्त केले.
युद्धसज्ज द्रोणाचार्यांना युद्धात हरविणे अत्यंत अशक्य आहे हे भगवान श्रीकृष्ण चांगल्याप्रकारे जाणुन होते. म्हणुन भगवान श्रीकृष्णांनी द्रोणाचार्यांना
त्यांचा मुलगा अश्वथामा युद्धात मारला गेला अशी बातमी सांगितली की गुरु द्रोणाचार्य हे आपली सर्व शस्त्रास्त्रे त्यागतील आणि त्यांना ठार मारणे सोपे
होईल अशी योजना व युक्ती योजली.
वरील योजने प्रमाणे भिमाने अश्वथामानावाच्या हत्तीला ठार मारले आणि अश्वथामा मेला, अश्वथामा मेला अशी अफवा पसरविली त्यामुळे गुरु
द्रोणाचार्यांना खरेच वाटले की त्यांचा पुत्र अश्वथामा युद्धात मारला गेला त्यामुळे गुरु द्रोणाचार्यांनी युद्धामधे सर्व शस्त्रास्त्रांचा त्याग केला व ध्यानस्त बसले हिच योग्यवेळ समजुन द्रुष्टद्युम्नाने गुरु द्रोणार्यांचा शिरच्छेद केला.
अश्वथामा ह्यांनी पांडवांच्या मुलांना का मारले:
जेव्हा दुर्योधनाला भिमाने मारले तेव्हा उरलेल्या कौरव योद्ध्यांनी ( अश्वथामा ह्यांच्यासकट) पांडवांना रात्री झोपेत मारण्याचा प्रयत्न केला
त्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी गुप्तपणे पाचही पांडवांना अज्ञात ठिकाणी नेले होते आणि अश्वथामा ह्यांनी पांडवांच्या तंबुत प्रवेश केला आणि पाचही पांडव पुत्रांचा वध पांडव समजुन चुकिने केला आणि तंबुला आग लावली.
जेव्हा पांडव पुन्हा परत आले आणि जेव्हा त्यांना वरील घटना समजली तेव्हा ते अतिशय शोकाकुल झाले. ते अश्वथामा ह्यांच्या शोधार्थ गुरु व्यासांच्या आश्रमात जातात, पांडवांना बघितल्यानंतर अश्वथामा ह्यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणुन ब्रम्हशिरस्त अस्त्र राहते जे गवतापासून बनविले गेले जे ते पांडवांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या विरोधात वापरणार होते.

ब्रम्हशिरस्त अस्त्र हा ब्रम्हास्त्राचा शोध होता जे अश्वथामा ह्यांनी अर्जुनाविरोधात वापरले होते त्या वेळी अर्जुनाने देखील ब्रम्हास्त्र वापरले.
दोन्ही अस्त्रे एकमेकांसमोर आल्याने पृथ्वीचा नाश होणार होता म्हणुन व्यासांनी दोघांना आपापली अस्त्रे मागे घ्यायला सांगितले.
अर्जुन ब्रम्हास्त्र मागे घेण्यात यशस्वी ठरला परंतु अश्वथामा हे त्यांचे ब्रम्हास्त्र मागे घेऊ शकले नाहीत कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना ब्रम्हास्त्र मागे कसे
घ्यायचे हे शिकवले नव्हते. ब्रम्हास्त्र हे स्वत:च कोणालाही कोणतीही इजा न पोचवताच नष्ट होईल अशा ठिकाणी त्या ब्रम्हास्त्राला दिशा देण्याऐवजी
अश्वथाम्यांनी ब्रम्हास्त्राची दिशा ही अर्जुनाच्या मुलाची (अभिमन्यु) पत्नी उत्तरा जी गर्भवती होती त्या तंबुकडे वळविली की ज्यामुळे एकाच क्षणात पांडवांचा निर्वंश झाला असता.
भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामांना श्राप का दिला:
उत्तरेच्या मुलाला भगवान श्रीकृष्णांनी वाचवले होते. अशाप्रकारे अश्वथामाह्यांनी पांडवांच्या कुटुंबातील प्रत्येकाला ठार मारायचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे क्रोधीत झाले आणि त्यांनी अश्वथामाह्यांना श्राप दिला.

शिक्षा म्हणुन भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामाह्यांच्याकडुन त्यांच्या मस्तकावरील मणी मागुन घेतला आणि मग भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामांना श्राप दिला की " तु ३००० वर्षे जंगलात रक्त आणि पू ह्यांच्याबरोबर जे त्याच्या(अश्वथामाह्यांच्या) जखमेतुन वाहत राहतील आणि तु(अश्वथामा) मृत्युसाठी रडत फिरत राहशील. त्याला(अश्वथामा) कोठेही थारा तसेच आश्रय मिळणार नाही तसेच तो (अश्वथामा) लोकांच्या संपर्कापासुन आणि समाजापासुन लांब राहील. तसेच त्याच्या (अश्वथामाह्यांच्या) मस्तकातुन मणी काढुन घेतल्यामुळे झालेली जखम कधीही बरी होणार नाही तसेच त्याचे (अश्वथामाचे) शरीराला हे कधीही बर्या न होणार्या जखमा होतील ज्या ३००० वर्षे बर्या होणार नाहीत."
अश्वथामा जिवंत आहे?:
१) इंटरनेटवर मुशाफिरी करताना मध्यप्रदेशात एक आयुर्वेदिक डॉक्टर रुग्नाच्या मस्तकावरील जखम बरी करण्याचा प्रयत्न करत होते परंतु रुग्नाच्या
डोक्यातुन रक्त प्रवाह थांबतच नव्हता. रुग्न हा उंच, काळा, देखणा आणि ताकतवान होता.
२) अजुन एका गोष्टीत मध्यप्रदेशातील असिरगड गावातील लोक असे मानतात की अश्वथामा आजही रोज सकाळी असिरगडच्या किल्ल्यातील शिव मंदिरात प्रार्थनेसाठी येतात आणि फुले शिवलिंगावर वाहुन जातात.
३) अजुन एका गोष्टीत एक योगी पायलट बाबांसारखे ज्यांनी सांगितले की ते अश्वथामांना भेटले आणि अश्वथामा हे हिमालयात एका जमातीबरोबर शांततेत राहत आहे.
असे मानले जाते की अश्वथामा हे पृथ्वीवर अजुनही भारतात नर्मदा नदीच्या बाजुने फिरतात.
संदर्भासाठी युट्युब वरील व्हिडिओंची लिंक
१) Is Ashwathama of Mahabharata still alive?
२) Ashwathama is alive with proof in Hindi | Ashwathama - The great warrior of Mahabharata (India)
३) Asirgarh Me Ashwathama !! Dharohar
सर्व चित्रे pintrest च्या सौज्यन्याने. Pinterest
अश्वत्थामा हा कृपाचार्यांची बहीण कृपी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा. तो कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुधन्य, शंभु, चण्ड आणि भव या ११ रूद्रांपैकी एकाचा अवतार आहे आणि बळी, व्यास, कृपाचार्य, हनुमंत, बिभीषण, परशुराम व अश्वत्थामा ह्या चिरंजीवांपैकी एक आहे. अश्वत्थामा शस्त्रास्त्रांच्या नियोग- विनियोगाच्या बाबतीत कर्णाच्या तोडीचा होता. वेदविद्येच्या ज्ञानात तो साक्षात वेदरचयीत्या व्यासांसम विद्वान, किंबहुना व्यासांनी वेद रचले ते अश्वत्थाम्याच्या सहयोगानेच. उर्जेने परिप्लुत असण्याच्या बाबतीत जणू कार्तवीर्य, भीष्मासम भीषण, परशुरामासम तेजस्वी, द्रोणासम अस्त्रविद्याविशारद, अर्जुनासम धनुर्धर, भीमासम गदाधर, यमासम भयाण, अग्नीसम ज्वलंत, सागरासम बलशाली, दुर्वासांसारखा कोपिष्ट, बृहस्पतीसम तज्ज्ञ असा हा अश्वत्थामा भार्गवराम परशुरामांचा शिष्य आहे. दुर्वास मुनींचा विद्यार्थी आहे, कृष्ण द्वैपायन व्यासांचा सहयोगी सेवक, भीष्मांचा लाडका, कृपाचार्यांचा भाचा, द्रोणाचार्यांचा पुत्र, शिष्य व सरतेशेवटी शिवाचा अंश आहे.
ह्या कलियुगातही अश्वत्थामा कपाळावर कधीच भरून न येणारी जखम घेऊन सर्वसामान्य लोकांना दर्शन देतो असा अनेकांचा विश्वास आहे.
महाभारतानंतर अश्वत्थाम्याने सामान्य मानवाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख १२व्या शतकात लिहिलेल्या 'पृथ्वीराज रसो' ह्या पुस्तकात आढळतो. ११९२ साली पृथ्वीराज चौहानचा महम्मद घोरीकडून पराभव झाल्यावर तो जंगलात लपून बसला. तिथे त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला. पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील आठ दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली. पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा पृथ्वीराजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने त्या व्यक्तीला 'आपण अश्वत्थामा आहात का?' असं विचारलं. होकार देऊन तो झटकन निघून गेला.
त्यानंतरचा उल्लेख १५व्या शतकात केलेला आढळतो. १५व्या शतकाच्या सुरूवातीला कर्नाटकात 'गदग' येथे 'नारायणाप्पा' नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने कन्नड भाषेत लिहिलेल्या 'कर्नाट भारत कथामंजिरी' या ग्रंथामुळे तो 'कुमारव्यास' या नावाने प्रसिद्ध झाला. त्याला महाभारत 'जसं घडलं तसं' लिहिण्याची इच्छा होती. त्यासाठी ज्याच्या डोळ्यादेखत महाभारत घडलं त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या 'वीर नारायण ' या देवासमोर त्याने अनेक वर्षे सतत व्यक्त केली. देवाने त्याला स्वप्नात येऊन म्हटले की 'माझ्या देवळात होणाऱ्या येत्या 'द्वादशी पारणं' उत्सवाला तू कसंही करून हजर राहा. उत्सवातून सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून त्याला 'महाभारत जसं घडलं तसं मला सांगा' अशी विनंती कर. तो प्रत्यक्ष अश्वत्थामा आहे. तो सांगेल ते लिहून घे.'
ठरल्याप्रमाणे कुमारव्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून तशी विनंती केली. ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की आंघोळ करून नेसत्या ओल्या वस्त्रांनिशी बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वत्थामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं. वस्त्रं सुकली की लेखणीतील शाई संपेल आणि त्या दिवसाचं काम थांबेल. दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं.
दोन्ही अटी मान्य करून कुमारव्यासा लिहू लागला. तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुध्द असलेल्या 'गदापर्वा' पर्यंत आला. इथे भीमाने 'अधार्मिक ' पद्धतीने केलेल्या आपल्या मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वत्थामा रडू लागला. कुमारव्यासही रडू लागला आणि त्याने भावनेच्या भरात हे गुपित आपल्या बायकोला सांगितलं. त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली. त्यामुळे कुमारव्यासाने लिहिलेलं 'आँखों देखा हाल' असलेलं महाभारत 'गदापर्व' येथे येऊन थांबतं. महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं असलं तरी ह्या महाभारताला सगळ्यात 'खरं' महाभारत समजलं जातं; कारण ते सांगणारा स्वतः अश्वत्थामा होता.
त्यानंतरचा उल्लेख अंदाजे २०० वर्षांपूर्वी 'शतानंद मुनीं'नी लिहीलेल्या 'सत्संगी जीवन' ह्या ग्रंथात आढळतो. भगवान 'स्वामीनारायण' यांची आई 'भक्तीमाता' आणि वडील 'धर्मदेव' हे त्यांच्या कुलदैवताची म्हणजे 'हनुमंता'ची ३ महीने साधना करायला अयोध्या येथल्या 'हनुमान गढी' येथे गेले होते तेव्हा हनुमंताने त्यांना असा दृष्टांत दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी. त्यांनी असं केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी 'शरयू' नदीकाठी असलेल्या 'चपैय्या' या गावी परत जावं कारण लवकरच त्यांच्या पोटी श्रीकृष्ण जन्म घेणार आहे. पती-पत्नी घरी यायला निघाले. एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच, तगड्या, भगवी वस्त्रं घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली. त्याचे डोळे रागावल्यासारखे लालबुंद होते आणि त्याने कपाळावर भुवयांच्या वरती वस्त्रं बांधलं होतं. त्याने पती-पत्नींची चौकशी केली तेव्हा भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहे असं सांगितलं. हे ऐकलं मात्र, तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला आणि त्याने विचारलं, 'कृष्ण, म्हणजे माझा शत्रू? तुमच्या पोटी जन्म घेणार आहे? त्याच्यामुळे मला या यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे की तुमच्या पोटी जन्मणारा मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्रं धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही'. एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. पती-पत्नी दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रडू लागले. त्या रात्री मारूतीराया त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, 'देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते. श्रीकृष्णाने तरी स्वतः कुठे हातात शस्त्र धरलं होतं?' मारूतीरायाने त्यांना जंगलाबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण जगात श्रीकृष्णाचा प्रचार केला.
त्यानंतर चा अश्वत्थाम्याचा उल्लेख वासुदेवानंद सरस्वती उर्फ 'टेंबे स्वामी' यांच्या जीवनचरित्रात केलेला आढळतो. १९१२ साली ते 'शूलपाणीश्वर'च्या जंगलात रस्ता चुकले होते. तेव्हा कपाळावर जखम असलेल्या एका उंच माणसाने त्यांना रस्ता दाखवला होता. गावाच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्याला विचारलं, 'आपला देह, चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही. आपण भूत, यक्ष किंवा देवदूत आहात का? आपण कोण हे मला खरं सांगा'. त्यावर तो माणूस म्हणाला, 'तुमचं म्हणणं खरं आहे. कारण मी या युगातला नाही. मी द्वापारयुगातला आहे. माझं नाव अश्वत्थामा'.
त्यानंतर चा उल्लेख 'पायलटबाबा'ने लिहीलेल्या 'हिमालय कह रहा है' या पुस्तकाच्या ९व्या प्रकरणात आढळतो. तिथे असा उल्लेख आहे की त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं. तिथे त्यांना अश्वत्थामा भेटला होता.
त्यानंतरचा उल्लेख २००५ साली 'प्राजक्ता प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'जगन्नाथ कुंटे' यांनी लिहिलेल्या 'नर्मदे हर हर' या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक २३० वर आढळतो. ते नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते तेव्हा अश्वत्थाम्यानेच त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होतं.
गुजरातमधील 'नवसारी' च्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही १२ फूट उंची असलेला अश्वत्थामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका डाॅक्टरनेही एका अति उंच माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रूग्ण अश्वत्थामा असल्याचे ओळखले होते असेही उल्लेख आंतरजालावर (इंटरनेट) आढळतात. पण त्या घटनांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
सगळ्यात अलिकडचा उल्लेख २०१५ साली प्रकाशित झालेल्या 'नमामि नर्मदे' या सतीश अनंत चुरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो. अश्वत्थामा त्यांच्याशी हिंदीत फक्त बोललाच नाही तर जेवणाच्या पंगतीत त्यांच्या बाजूलाही बसला होता. त्याने डोक्याला प्लास्टिक ची पिशवी गुंडाळली होती आणि त्याच्या कपाळावरच्या कुजलेल्या जखमेवर माशा घोंघावत होत्या. आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. पंगत सुरू होण्याच्या आधी तो अश्वत्थामा असल्याचं सतीश चुरी साहेबांनी ओळखलं व 'बाबा राम' नावाच्या त्यांच्या मित्राला त्यांनी त्यांच्याजवळ असलेला कॅमेरा काढून फोटो काढायला सांगितलं. पण तेवढ्यात पंगत सुरू झाल्याची घंटा वाजली आणि अश्वत्थामा झटकन पंगतीत जाऊन पोहोचला. ताटं वाढून सगळे जेवायला बसल्यावर अश्वत्थामा चुरी साहेबांच्या बाजूलाच येऊन बसला आणि सगळ्यांच्या आधी जेवण संपवून ताट फेकून बाहेर निघूनही गेला. सगळ्या गोष्टी इतक्या झटकन घडल्या की चुरी साहेबांना त्याचा फोटो काही काढता आला नाही.
एकूण काय तर अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो हे जरी शपथेवर अनेक आदरणीय व्यक्ती म्हणत असल्या तरी आजपर्यंत कोणीही त्याचा फोटो काढू शकलेला नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही. त्यामुळे अश्वत्थामा हे अजूनही एक न सुटलेलं कोडं आहे.
वरील उत्तर हे मी मला आलेल्या एका लेखातून घेतले आहे, हा लेख मला व्हॉटसअप वर आलेला होता व यात मी काही बदल करून येथे टाकले आहे, सदर लेखाचे मुळ लेखक भेटले नाही तरी कोणाला इथे माहीत असल्यास सांगावे, त्यांचे नाव मी टाकील.
Comments
Post a Comment