महाभारताच्या युद्धानंतर काय झाले, ह्या विषयावर एखादे पुस्तक आहे का?
अर्जुन -अभिमन्यू- परीक्षित
पांडवांनी स्वर्गाकडे प्रस्थान केले त्यात युद्धिष्ठर पोचले बाकी पांडव वाटेतच मृत्यू पावले. नंतर अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा परीक्षिताने राज्य कारभार हाती घेतला. त्याच्या मृत्यूनंतर जन्मेजयाने राज्य केले. परीक्षिताला साप चावून मृत्यू आला म्हणून जन्मेजयाने सर्प यज्ञ केला आणि त्यात यज्ञकुंडा मध्ये मध्ये जगातले सर्व साप खेचले जाऊ लागले. पण तक्षक (नागांचा राजा) इंद्राकडे लपून बसला. तेव्हा जन्मेजयाने "इन्द्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा" अशी आहुती दिली, तेंव्हा आस्तिक नावाच्या ऋषींनी, ज्यांची माता नाग कुळातील होती, त्यांनी मध्ये पडून ततो यज्ञ थांबवला.
जन्मेजयानंतर असीमकृष्णा नंतर, अश्वमेधाताने राज्य केले. त्यानंतर निश्चक्र (निश्चक्रने कोसंबीला राजधानी हलवली कारण हस्तिनापूर पाण्यामध्ये बुडाले होते), उष्ण, चित्ररथ, विष्णुमायत , सुषेण, सुनीथ असे अनेक राजा झाले, नंतर क्षेमक हा शेवटचा राजा होता त्याला विश्व या राजाने मारले आणि या कुरु कुळाचा शेवट झाला. युद्धिष्ठिरानंतर ३० पिढ्यानी राज्य केले.
(अर्जुन -- बभ्रुवाहन ) (कर्ण वृषकेतु )
अर्जुनाला चित्रांगद पासून बभ्रुवाहन नावाचा मुलगा असतो. मणिपूरमध्ये त्याला आजोबांचे राज्य मिळाले होते, अर्जुनाबरोबर युद्ध करून बभ्रुवाहनानें पांडवसैन्याचा नाश करून अर्जुनासहित सर्व योद्धयांना मारले. त्याच्या माता चित्रांगदा व उलुपी यांना पतीवधाचा अतिशय शोक होऊन त्या पुत्राला दूषणें देऊं लागल्या. बभ्रुवाहनाने नागांबरोबर युद्ध करून मृतसंजीवकमणि अर्जुनादिकांना जिवंत करण्यास आणला; पण त्यापूर्वी अर्जुनाचे शीर एका नागाने पळविले. कृष्णाने आपली ब्रह्मचर्याची पुण्याई खर्च करून तें शीर आणविले. याप्रमाणे अर्जुनादि वीर जिवंत झाले व पुनः पूर्ववत अश्वरक्षणार्थ निघाले.या युद्धात कर्णाचा एकमेव सर्वात लहान मुलगा वृषकेतु मरण पावला बभ्रुवाहनाच्या हातातून. बभ्रुवाहनाच्या पुढे पिढीची माहिती मिळत नाही.
यादव
महाभारत युद्धाची चर्चा करताना प्रभासक्षेत्री सात्याकि आणि कृतवर्मा यांच्यात वादविवाद झाले. सात्याकिने रागारागात कृतवर्माचा शिरच्छेद केला. यावरून त्यांचं आपापसात युद्ध सुरू झालं, ते गटागटात विभाजीत झाले आणि एकमेकांचा संहार करू लागले. या युद्धात श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि मित्र सात्याकिबरोबर सर्व यदुवंशी मारले गेले. फक्त बभ्रू, दारूक व प्रद्युम्नचा नातू वज्र हेच या सगळ्यातून वाचले.कृष्ण आणि बलराम यांच्या अंत झाला. यादवी नंतर यादवांच्या भोज, अंधक, वृष्णी या वंशाच्या विधवा झालेल्या यांच्या सर्व स्त्रिया, मुले आणि वज्रला घेऊन सातव्या दिवशी अर्जुन इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.अर्जुनाने कृतवर्माच्या मुलाला मृत्तिकावत इथे राज्यावर बसवले.वृष्णी वंशाच्या सेनानी सात्यकीचे मुलगा असंग सरस्वती नदीच्या काठी सात्वत या ठिकाणी राजा बनवले. नंतर श्रीकष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा होता अनिरूद्ध, ज्याचा विवाह दैत्यकन्या उषाशी झाला होता . त्यांना एक मुलगा होता तो म्हणजे यादवांचा उरलेला एकमेव वंशज म्हणजे वज्रनाभ.
महाभारत युद्धानंतर म्हणजे पांडव हे अर्जुनाचा नातु परिक्षिताकडे राज्यकारभार सोपवून स्वर्गरोहीणी मार्गे स्वर्ग लोकी जातात त्यानंतर राजा परिक्षिताने
सर्व राज्यकारभार केला. परिक्षिताने अत्यंत चांगल्या पद्धतीने, धर्म, निती, न्याय, सत्य मार्गाने राज्यकारभार केला तसेच प्रजेवर पुत्रवत प्रेम केले.
परिक्षिताच्या राज्यात एकदम अधर्म, अनिती, अत्याचार, हिंसा, चोरी ह्यागोष्टिंमधे वाढ होते आणि राज्यात अंदाधुंदी, अनाचार माजतो. राज्यात अशा
गोष्टींमधे वाढ होण्याचे कारण शोधण्यासाठी राजा परिक्षित राज्यामधे फिरत असताना वातावरणामधे एकदम बदल होतो आणि सर्व बाजुंनी अंधारुन येते तेव्हा राजा परिक्षित त्याच्या सैनिकांना विचारतो की सगळीकडे अंधारुन का आले आहे?
तेव्हा त्याचे सैनिक उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे राजा परिक्षित तसाच पुढे मार्गक्रमण करतो त्यावेळी धर्मराजाच्या रुपातील एक बैल आणि पृथ्वीच्या रुपातील एक गाय त्याला दिसतात तेव्हा तो त्यांच्यातील संभाषण ऐकतो. बैलाचे पहीले तिन्ही पाय तुटलेले असतात तेव्हा गाय बैलाला त्याची अशी अवस्था का झाली असे विचारतो तेव्हा बैल गायीला उत्तर देतो की राजा परिक्षिताच्या राज्यातील धर्म, निती,
न्याय हे नष्ट झाले आहेत तर त्याचे तिन्ही पाय अनुक्रमे धर्म,निती,न्याय ह्याचे निदर्शक आहेत त्यामुळे त्याचे तिन्ही पाय नष्ट झालेले आहेत आणि त्याचा
शेवटचा चौथा पाय हा सत्याचा निदर्शक असून तो फक्त शिल्लक राहिला आहे हे संभाषण ऐकुन राजा दु:खी होतो.
त्याच वेळी एक काळा माणुस (कलि) तेथे येवुन बैल आणि गाय ह्यांना मारहाण करु लागतो, हे अर्थातच परिक्षित राजाला आवडत नाही त्यामुळे
परिक्षित राजाला राग येतो आणि तो कलिला म्हणतो की तु हे खुप मोठे पाप करीत आहेस तर तु नक्किच माझ्या शिक्षेस पात्र होशील, असे म्हणुन
राजा परिक्षित त्याला(कलिला) शिक्षा करण्यासाठी जातो तेव्हा कलि आणि राजा परिक्षितामधे युद्ध होते. युद्धामधे राजा परिक्षित कलिला बंदी बनवतो
तेव्हा कलि परिक्षिताला शरण जातो आणि त्याच्या(कलिच्या) वास्तव्या साठी जागेची मागणी करतो. राजा परिक्षित हा अतिशय दयाळु आणि उदार
असल्याने तो कलिला
१) सोने
२) मदिरा(दारु)
३) वेश्यालय
४) द्युतगृह
५) पैसा
ह्या ठिकाणी वास्तव्यास परवानगी देतो आणि येथुनच कलियुगाचा प्रारंभ झाला आहे.
ह्या सर्व गोष्टी भागवतपुराणात नमुद केलेल्या आणि उल्लेखिलेल्या आहेत.
इरावती कर्वे यांचे "युगांत " हे पुस्तक महाभारत युध्दानंतरच्या घडामोडीवर उत्तम आहे.
भागवत पुराणातील पान नंबर समजतील का??
इरावती कर्वे ह्यांनी लिहिलेलं संदर्भ व्यासांच्या महाभारतातील आहेत का? कारण काल्पनिक कथा असू शकतात असे वाटते.
युद्धानंतर काय झाले, याचे वर्णन महाभारतातच आहे. युद्ध समाप्तीच्या घटनेवर महाभारत ग्रंथाची समाप्ती झालेली नाही. महभारताची ११ ते १८ ही पर्व युद्धानंतरच्या कालखंडावरच आहेत.
युद्धानंतरच्या काही घटनांवर आधारलेले धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ हे हिंदी नाटक आणि रत्नाकर मतकरी यांचे ‘आरण्यक’ हे मराठी नाटक प्रसिद्ध आहे. परंतु युद्धसामाप्ती पासून ते स्वर्गारोहणापर्यंतच्या सर्व घटनांचा समावेश असलेले एकचएक असे पुस्तक माझ्या तरी पाहण्यात नाही.
युद्धानंतरच्या स्वर्गारोहणा पर्यंत च्यख सर्व घटना पर्व भाग २ मध्ये कादंबरी स्वरुपात आहेत. मूळ कादंबरी भैरप्पा यांची आहे. मराठी अनुवादकाचे नाव लक्षात नाही.
अनेक वर्षापूर्वी माझ्या वाचनात आलघ होती.
गितेच्या पहिल्या अध्यायात युद्धानंतर च्या परिस्थितीचे चित्र अर्जुनाने वर्णन केले होते, तसे प्रत्यक्षात घडले का ? अर्जुन म्हणाला की, कुलक्षयाचे घोर परिणाम मला स्पष्टपणे दिसत आहेत. कुलाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात, धर्म सुटला की सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो, अधर्मा ने ग्रासले म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रीया बिघडल्या की वर्णव्यवस्था नाश पावते, वर्णसंकर हा कुळाला नरकात नेतो कारण श्राद्ध - तर्पण आदी क्रिया लुप्त झाल्याने पितर अधोगतीला जातात. अर्जुन पुढे म्हणतो की, आम्ही असे ऐकले आहे की कुलधर्म नष्ट झालेल्या माणसाला खचित नरकवास प्राप्त होतो.
अर्जुनाने जे चित्र उभे केले होते, तसे काही झालेले दिसत नाही. अर्जुन शेवटी नरकात न जाता स्वर्गात गेला.
Comments
Post a Comment