रामविष्णूचा एक अवतार/ हिंदू देवता
राम
राम किंवा श्रीराम हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.
| राम | |
श्रीराम seyoey6 - इत्यादींची अधिपती देवता | |
| मराठी | राम |
| संस्कृत | राम: |
| कन्नड | რამა |
| तमिळ | இராமர் |
| निवासस्थान | अयोध्या |
| शस्त्र | धनुष्य, बाण |
| वडील | दशरथ |
| आई | कौसल्या |
| पत्नी | सीता |
| अपत्ये | लव , कुश |
| अन्य नावे/ नामांतरे | कौसल्येय, दाशरथी, रघुनंदन, रघुनायक, रघुपती, भरताग्रज, इ. |
| या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
| मंत्र | श्रीराम जय राम जय जय राम |
| नामोल्लेख | रामायण |
| तीर्थक्षेत्रे | अयोध्या |
श्रीरामाच्या काही नावांचा उगम
राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्याना आनंदात रममाण करणारा.
रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.
श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.
आदर्श व्यक्तिमत्व
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
रामराज्य
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते.
राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ
- रामायण (या महाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेले काव्य आहे.)
- अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणार्या सुषमा शाळिग्राम)
- गीत रामायण - ग.दि.माडगूळकर
पहा
रामायणाचा काळ
वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे, की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही संशोधन करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले आहेत.
रामायणकाळ इसवी सन पूर्व २००० पूर्वीचा नाही.संपादन करा
- भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलीकडे जात नाहित. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खोऱ्यातील काही लोकांनी गंगेच्या खोऱ्यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पूर्वी हा भाग ग्रामीणसंस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी.बी. लाल यांनी केलेल्या उत्खननांवरून रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पूर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते.
- कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलीकडेे नेत नाहीत.
- भारतीय पुरातत्ववेत्ते एच.डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत.
- रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
- रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा व रामकाळी वानरसेनेने बांधला अशी श्रद्धा असलेला तरंगत्या पाषाणांच्या सेतूचेे वय, कार्बन डेटिंंगनुसार साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणणे मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरते.
- रामायणाचा काळ -रामायण रचनेच्या काळाबद्दल संशोधकात मतभेद आहेत. मूळ रामायणाची रचना बुद्धपूर्व काळात म्हणजे सन पूर्व पाचव्या शतकात झाली असावी असे श्री.कामिल बुल्के यांचे मत आहे.याकोबी,म्याक्डोनाल्ड,Vinternitz, मोनिअर विल्यम्स ,चि.वी.वैद्य यांचेही हेच मत आहे कीथ मात्र मूळरामायण सनपूर्व चौथ्या शतकात झाले असे मानतो. डॉ.शांतिकुमार नानुराम व्यास यांच्या मते वाल्मिकीचे मूळ रामायण पाणिनीच्या पूर्वी (सन पूर्व ८००) रचले गेले असले पाहिजे.कारण रामायणात संस्कृत भाषेचे अनेक आर्ष प्रयोग आढळतात .मूळ रामायणाचा विकास होत गेला त्या गोष्टीला कित्येक शतके लोटली असावी.प्रस्तुत रामायण हे इ .स.च्या दुसऱ्या शतकात निर्माण झाले, असे याकोबी व Vinternitz हे मानतात; तर चि.वी .वैद्य यांच्या मते हा काल अंदाजे स.पू. १०० हा येतो.श्री.महाराष्ट्रीय व श्री .बाळशास्त्री हरदास यांच्यामते हा काळ स.पू. २५२८ हा आहे.[१]
उपक्रमावरील चर्चा
रामायणाचा काळ आणि रामाला देवत्व केव्हा प्राप्त झाले या संदर्भात उपक्रमावर झालेली ही [१] चर्चा वाचावी.
भारतीय संस्कृति कोश -खंड ८,पुनर्मुद्रण मार्च २०१०
Comments
Post a Comment