ब्रम्ह देवाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 4.32 x 1000 बिलीयन वर्षे असे म्हणतात. महाभारतातही एका राजाची गोष्ट अशी आहे. इंटरस्टेलरमध्ये जसे दाखवले आहे. त्या अनुशंगाने, सृष्टीचा रचियेता ब्रम्हा कोणत्यातरी दूर ग्रहावरचा परग्रहवासी तर नसेल ना?

खूप दिवसापासून हा प्रश्न मनात आहे. तुम्ही मी विचारलेले प्रश्न पाहिलेत तर या प्रश्ना संदर्भात १ / २ प्रश्न मीही विचारले आहेत,

या दोन्ही विषयावर माझा जास्त अभ्यास नाही पण आवड आहे, खाली मी जे उत्तर लिहीन त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास दुरुस्ती करावी. कारण Quora वर या विषयातली अनेक तज्ञ मंडळी आहेत.

या प्रश्नात खूप सारे मुद्दे आहेत म्हणून एक एक मुद्द्यावर बोलू

  • महाभारतातील ती गोष्ट
  • महाभारतातील गोष्टीची विश्वासार्हता
  • इंटरस्टेलर चित्रपटाची थोडक्यात गोष्ट
  • इंटरस्टेलर चित्रपटाची विश्वासार्हता
  • महाभारतातील गोष्ट आणी इंटरस्टेलर यांचं एकत्रित विश्लेषण

महाभारतातील गोष्ट

रेवती ही राजा काकुदमीची एकुलती एक मुलगी होती, तो एक शक्तिशाली राजा होता, ज्याने कुशाथलीवर राज्य केले, या जगात आपल्या हुशार मुलीशी लग्न करण्यास योग्य असा वर मिळत नाही, असे वाटून काकुदमी रेवतीला योग्य पती शोधण्याविषयी देवाचा सल्ला विचारण्यासाठी ब्रह्मलोका (ब्रह्माच निवासस्थान) येथे घेऊन गेले.

जेव्हा ते आले तेव्हा ब्रह्मा संगीत ऐकत होते, म्हणून त्या दोघांनी वाट पाहिली. काकुडमी यांनी नम्रतेने नमन करून तिथे येण्याचं कारण सांगितलं. ब्रह्मा मोठ्याने हसले आणि त्याला म्हणाले की प्रत्येक ग्रहावर काळ हा वेगवेगळ्या प्रवाहात वाहत असतो. त्यामुळे तुम्ही इथे थोडाच वेळ थांबले आहात तो पर्यंत पृथ्वीवर २७ युग उलटून गेलीत. आणी तिच्या वयाचे सगळे उमेदवार मरण पावले आहेत. ब्रह्मा पुढे म्हणाले की, काकुडमी आणी रेवती आता त्यांच्या काळातले दोघेच उरले आहात कारण त्याचे मित्र, मंत्री, नोकर, बायका, नातेवाईक, सैन्य आणि खजिना आता पृथ्वीवरून नाहीसे होऊन कितीतती पिढया उलटून गेल्यात

या बातमीने राजा काकुडमी आश्चर्यचकित झाले. तथापि, ब्रह्माने त्याचे सांत्वन केले आणी सांगितले की सध्या कृष्ण आणि बलरामच्या रूपात पृथ्वीवर दोन तरुण आहेत आणि त्याने रेवतीसाठी योग्य पती म्हणून बलरामला निवड अस काकूडमीला सांगितलं

त्यानंतर काकुडमी आणि रेवती पृथ्वीवर परतले, थोड्या वेळापूर्वीच त्यांनी जे जग सोडलं होत ते सगळं बदलून गेलं होतं.

नंतर बलराम आणी रेवतीच लग्न झालं. रेवती खूप आधीच्या पिढया मधली होती म्हणून ती बालरामापेक्षा खूप उंच होती. म्हणून मग बालरमाने तिच्या डोक्यात नांगर घालून तीची उंची कमी केली

महाभारतातील गोष्टीची विश्वासार्हता

मी आधी जेव्हा ही गोष्ट वाचली तेव्हा एखादी दंतकथा म्हणून फारसा विचार न करता विषय सोडून दिला. पण नंतर आईनस्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धान्त आणी नंतर इंटरस्टेलर हा सिनेमा पहिला आणी काही अंशी या गोष्टीचा परत विचार कारावासा वाटला.

आता मुद्दा हा येतो की जर ही पुराणातील गोष्ट आहे तर या गोष्टीचा उल्लेख प्रथम कधी आला ? सापेक्षवादाचा सिध्दांत आईनस्टाईन नी १९०५ साली मांडला. जर या कथेचा उल्लेख या आधी कधी आला असेल तर एक गोष्ट अधोरेखित होते की "प्रत्येक ग्रहावर वेळ एकसारखी नसते ती तिच्या गरुत्वाकर्षना नुसार बदलत जाते" ही गोष्ट आईनस्टाईनचा सिद्धांत येण्या आधी देखील माहीत होती अस मानायला हरकत नाही.

पण हा सिद्धांत येऊन आता ११५ वर्षे उलटली आहेत. या दरम्यान जर कुणी ही गोष्ट मुद्धामहून मध्ये घुसवण्यावचा प्रयत्न केला असेल तर मात्र हा खोडसाळपणा आहे.

बाकी वर लिहलेली गोष्टींचा संदर्भ मला गुगल च्या विकिपीडियावर मिळाला. या गोष्टीचा उल्लेख १९०० च्या आधी झाला आहे का या संदर्भात काही माहीत असेल तर टिप्पणी मध्ये जरुर द्या.

इंटरस्टेलर चित्रपटाची कथा थोडक्यात

ही भविष्यात घडणारी कथा आहे. पृथ्वीवरच जीवन संकटात आहे. म्हणून NASA ने १० अंतराळवीर अंतराळात वेगवेगळ्या ग्रहावर पाठवले आहेत. त्या १० पैकी फक्त ३ ग्रहावरून अंतराळवीरानी संदेश पाठवला आहे की तिथे राहण्यासाठी योग्य वातावरण आहे. म्हणून चित्रपटाचा नायक कूपर आपली १० वर्षाची मुलगी मर्फ आपला मुलगा यांना सासऱ्याकडे सोडून दुसऱ्या ग्रहावर जीवन शोधायला निघून जातो. त्या ३ ग्रहा पैकी पहिला ग्रह जी मिलर या अंतराळवीर होती तिने पाठवला होता. तो ग्रह कृष्ण विवर ( ब्लॅक होल) च्या जवळ असल्या कारणाने त्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण खूप जास्त आहे. ते गुरुत्वाकर्षण इतके जास्त आहे की त्या ग्रहावर १ तास तुम्ही राहिलात तर पृथ्वीवर ७ वर्ष निघून गेली असतील. तिथे पोहचल्यावर कूपर ला कळते की हा ग्रह राहण्या योग्य नाही. पण तिथे थोडा जास्त वेळ गेल्यामुळे त्या काही तासात पृथ्वीवर २३ वर्ष उलटलेली असतात. पुढील सगळी कथा सांगत बसत नाही. नंतर कूपर ब्लॅक होल च्या जवळपास पोहोचतो तिथून वर्म होल च्या साहाय्याने परत पृथ्वी वरच्या लोकांनी अंतराळात एक स्टेशन बनवलेलं आहे तिथे पोहोचतो. तेव्हा जवळपास १२५ वर्षाचा कालावधी निघून गेलेला असतो. त्याची १० वर्षाची मुलगी आता १०० पेक्षा जास्त वयाची अंथरुणाला खिळलेली आहे. तिच्या बाजूला तिचा सगळा परिवार आहे. पण गमतीचा भाग म्हणजे कूपर जसा १२५ वर्षांपूर्वी दिसत होता तसाच दिसतोय. आणी त्याची नातवंड त्याच्या पेक्षाही मोठी आहेत. सिनेमाची पूर्ण कथा लिहीत नाही. जेवढे संदर्भ हवेत तेवढीच दिलीये.

इंटरस्टेलर सिनेमाची विश्वासार्हता

हा सिनेमा हॉलिवूड चा दिग्दर्शक ख्रिसतोफर नोंलन याने दिग्दर्शित केला आहे. या दिग्दर्शकाला जगभरात बराच मान आहे. आपल्या बॉलीवूड च्या "फॅक्टरी" मधून बाहेर आलेले मसालापट जे दिग्दर्शक स्वतः सांगतात आमचा सिनेमा पाहताना डोकं सिनेमागृहाच्या बाहेर ठेवून या अशा पठडीतला हा दिग्दर्शक नाही. प्रेक्षकांना विचार करायला भाग पडणारे सिनेमे बनवणं हा या दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो. या सिनेमाचे सहर्निर्माते आणी सल्लागार थोरने हे एक अस्ट्रो फीसिसिस्ट आहेत, त्यांना २०१७ साली नोबल पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी लीगो डिटेक्टर नावच यंत्र बनवलं आहे जे गरुत्वाकर्षणचे तरंग मोजत. या सिनेमा मध्ये आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांत, आईनस्टाईन चा सापेक्षवादाचा सिध्दांत आहे. (इंग्रजी कोरा वर या संदर्भातील एका उत्तरामध्ये समांतर आयुष्याची संकल्पना देखील मांडली आहे) आपण भविष्यात कालयात्रा करू यावर बरचसे शास्त्रज्ञ आशादायी होते. आईनस्टाईन पासून ते स्टीफन हॅकिंग पर्यंत सगळ्यांनी आपआपल्या परीने या संदर्भात काहिनाकाही शोध लावले आहेत

सगळ्या गोष्टीमुळे हा सिनेमा वास्तविकतेच्या अगदी जवळपास पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही.

महाभारतातील गोष्ट आणी इंटरस्टेलर चित्रपट एकत्रित विश्लेषण

दोन्ही गोष्टी मध्ये कालयात्रा आहे. एक पुराणातली तर दुसरी भविष्यातली. आपण विश्वास ठेवावा की न ठेवावा हा आपला वयक्तिक प्रश्न. पण जर या पुराणातील गोष्टी मध्ये थोडं जरी तथ्य असेल तर कधीकाळी मानव खूप प्रगत होता हे अधोरेखित होइल. आणी इंटरस्टेलर सिनेमा कडे पाहून वाटत की आपण आज जसे या देशातून त्या देशात सहज जाऊ शकतो तसे तो काळ पण दूर नाही जेव्हा आपण एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर सहज जाऊ शकू.

आता राहिला ब्रह्मदेवाचा प्रश्न. इंटरस्टेलर मधेही एक अज्ञात शक्ती दाखवली आहे. जी ४८ वर्षांपूर्वी दुसऱ्या गलाक्सि मध्ये प्रवेश करायला वॉर्म होल बनवून ठेवते. जी कूपर ला ब्लॅक होल मध्ये जाऊ न देता tessaract म्हणजे वेगळ्याच आयाम मध्ये घेऊन जाते आणी तिथून थेट त्याच्या मुलीकडे म्हणजे मर्फ कडे सोडते. मग ही अज्ञात शक्ती म्हणजे परग्रहवासी असतील किंवा भविष्यातला प्रगत मानव असेल.

ककुद्मीची गोष्ट घुसवण्याची शक्यताच नाही.कारण १९०५च्या मागे पुढे, ज्या लोकांना घुसवण्याएवढे संस्कृत येत होते, त्यांच्या पर्यंत relativity theory पोचलीच नव्हती.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या