विठ्ठल 28 युगांपासून विटेवर उभा आहे, यातील 28 युगे कोणती?
पौराणिक (वैदिक नाही) मान्यतांनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प होय. या एका कल्पात एका नवीन सृष्टीची निर्मिती होते. एका कल्पात १४ मन्वंतर नामक कालखंड येतात, आणि या प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी प्रलय येतो आणि त्यानंतर त्यातून वाचलेला एक महापुरुष पुढील मन्वंतरात सात ऋषिंच्या (सप्तर्षि) सहाय्याने मानवी संस्कृतीची पुनर्स्थापना करतो. त्याला त्या युगाचा मनु म्हटले जाते, आणि त्याची संतती म्हणजे मनुष्य/मानव. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे असतात. प्रत्येक महायुगात कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगआणि कलियुग अशी चार युगे येतात. या युगांचा कालावधी ४:३:२:१या गुणोत्तरात असतो. यातील सर्वात लहान युगाचा म्हणजेच कलियुगाचा कालावधी ४ लक्ष ३२ सहस्र वर्षांचा म्हटला गेला आहे.
या क्षणी आपण श्वेतवराह कल्पाच्या ७ व्या म्हणजे वैवस्वत मन्वंतराच्या २८ व्या महायुगाच्या ४ थ्या युगात म्हणजे कलियुगात आहोत. "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा" मधील युगे म्हणजे ज्याला पुराणात महायुग म्हटले आहे ती. म्हणजे या मन्वंतराच्या सुरुवातीपासून, म्हणजेच अनादि काळापासून किंवा कोण जाणे कधीपासून असा त्याचा अर्थ आहे.
टीप: वर सांगितलेल्या पौराणिक मान्यताही सर्वमान्य नाहीत आणि पुराणा-पुराणांतही मतभेद आहेत. शिवाय, वेदांत विशेषतः मनुचा उल्लेख असला तरी मन्वंतर, महायुग, देव हे पद असणे वगैरे अशा इतर सर्व गोष्टींचा उल्लेख आढळत नाही.
................................................................................
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरसुग आणि कलियुग अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो.
सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.
विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)’)
अधिक माहितीसाठी : http://www.sanatan.org/mr/a/422.html
४,३२,००० मानवी वर्षे = १ कलीयुग
८,६४,००० मानवी वर्षे = १ द्वापरयुग
१२,९६,००० मानवी वर्षे = १ त्रेता युग
१७,२८,००० मानवी वर्षे = १ सत्य युग
४३,२०,००० मानवी वर्षे = एक महायुग
................................................................................
कलियुगाचे किती वर्ष शिल्लक आहे?
माझं आयुष्य जेवढं आहे तेवढं 'कलियुग' आहे आणि माझं आयुष्य जेवढं आहे तेवढं 'सत्ययुग' आहे. कलियुग आणि सत्ययुग माझ्या बुद्धीत आहे, मी माझ्यात बदलच केला नाही आणि मी हरामखोरीच करत राहिलो तर ते कलियुग.. आणि सत्यांच्या मार्गाने चालायला लागलो तर सत्ययुग…
आज माझी बुद्धी बिघडली आहे, दुसऱ्याच्या खिशातील पैसा माझ्या खिशात कसा येईल ह्याचाच विचार करतो आहे, मी फक्त माझं माझं करतो आहे.
ज्या क्षणी माझी बुद्धी बदलेल त्याच क्षणी कलियुग संपेल…
दिवस रात्र चालू आहे पण, मी मात्र तसाच आहे… सकाळी उठायचं ऑफिसला जायचं, 8 तासाच्या कामामध्ये 6 तासच काम करायचं, म्हणजे मी 2 तासाची चोरी करतो, मुलांना शाळेत चांगलं शिकवतात , मुलगा घरी आला की मी मुलाला दुनियादारी शिकवतो.. मी मुलांना कलियुग निर्माण करण्याचे धडे शिकवतो…. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण माझ्या घरी नाही तर शेजारच्या घरी….माझा मुलगा वकील डॉक्टर इंजिनिअर बनावा पण माणूस बनता कामा नये ह्यासाठी मी दक्ष (alert) आहे..
नैतिकतेचे धडे केवळ पाठ्यपुस्तकातच राहिले जीवनात उतरवलेच नाही.. अभ्यास भरपूर केला, चांगले मार्क ही मिळाले … कश्यासाठी एवढा खटाटोप केला ? तर 20 ते 25 हजाराच्या नोकरीसाठीच!!!
मी शेतकरी आहे पण माझा मुलगा खूप शिकवा आणि मोठा अधिकारी बनावा , मग शेती कोण करणार ? शेती विकायची आणि बँक अकाउंट भरून टाकायचं .. शेतात एवढी मेहनत करण्यापेक्षा अन्न विकत आणू आणि खाऊ…ह्याला मी प्रॅक्टिकल पणा समजतो आहे.
हिरव्यागार निसर्गाकडे पाहून आनंद नाही मिळत, पण हिरव्यागार नोटांकडे पाहून आनंद मिळतो आहे… मी मतदानाच्या वेळी पैशाने, दारूने विकला जातो आहे…'मी' विकला जातो !!!
मी मंदिरात रोज जातो , मला हेच वाटतं की देव मंदिरात आहे ,मंदिरात मी विडी नाहीं फुंकत, शिव्या ही नाही देत पण मंदिरातून बाहेर पडलो की, विडी फुंकतो, शिव्या देतो..
कलियुगाचं कारण, मी मंदिरातच देवाला ठेवलं आहे जर त्या देवाला माझ्या बरोबर ठेवलं असतं तर कधीच कलियुग संपलं असतं…
पण मला हरामखोरी करता यावी, भ्रष्टाचार करता यावा म्हणून देवाला देव्हाऱ्यात आणि मंदिरात अडकवून ठेवलं मग मला सांगा कसं काय सत्ययुग येईल…
मी सत्ययुगाची वाट बघत बसलोय पण स्वतःच्या बुद्धीला बदलवायला तयार नाही…
मी मेलो की कलियुग संपणार ह्याचं कारण मी माझ्या मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना चांगलं जीवन जगूच दिलं नाही.. मी लोकांना बिघडवलं आहे
(मंदिरात रोज गेलं पाहिजे ह्याचं कारण मंदिरातील वातावरण, मंदिरात गेल्यानंतर जी मानसिकता असते ती मानसिकता ते वातावरण घरात, ऑफिसात, समाजात निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे)
कलियुग ४,३२००० वर्षांचे आहे.
‘चार हजार सातशे साठी। इतुकी कलियुगाची रहाटी ।’ असे श्री समर्थांनी श्रीमत दासबोध लिहीताना सांगितले आहे.
१६५९ साली श्रीमत दासबोध लिहून संपला, म्हणजे आतापर्यंत ३६१ वर्षे झाली.
४७६०+३६१= ५१२१ वर्षे संपली.
४३२०००-५१२१= ४२६८७९ कलियुगाची वर्षे शिल्लक आहेत.
असं म्हणतात कलियुगाने आत्ता कुठं बाळसं धरलंय !
कलियुग संपेपर्यंत आपल्यापैकी कुणीही नसणार.
Comments
Post a Comment